*🔅 सुरभी आख्यान🔅*
------------------------------------
नारायण म्हणाले, "ती गाईची अधिदेवता असून ती सुरभी गोलोकातच उत्पन्न झाली. एकदा राधानाथ राधा व गोपिकांसह वृंदावनात गेले. तेथे बराच कालापर्यंत त्यांनी एकांतात विहार केला. तेव्हा भगवंताला दूध प्यावेसे वाटले. त्यावेळी आपल्या डाव्या बाजूतून त्यांनी सुरभीला उत्पन्न केले. ती सवत्स व दुभती धेनू असून तिच्या वत्साला मनोरथ म्हणतात. त्या धेनूला पाहिल्यावर दामाने एका भांडयात तिचे दूध काढले. ते अमृताहूनही मधुर दूध भगवान पिऊ लागले. पण अचानकपणे त्यांच्या हातातून भांडे निसटले व ते जेथे पडले तेथे दुधाचे सरोवर झाले. ते अत्यंत विस्तृत असे शंभर योजनेपर्यंत प्रचंड होते. गोलोकात क्षीरसरोवर म्हणून ते विख्यात आहे.
ते सरोवर गोपी व राधा यांना पुष्करणीइतके प्रिय झाले. त्याचवेळी जेवढे गोप होते तेवढयाच आणखी कित्येक सवत्स कामधेनू सुरभीच्या शरीरातून प्रकट झाल्या. पुढे त्याच्याच संततीने जग व्यापले आहे. प्रथम भगवंताने तिचे पूजन केले. नंतर त्रिभुवनात ती पूजिली जाऊ लागली. कार्तिक शुद्ध प्रतिपदेस त्या सुरभीची पूजा करावी.
"ॐ सुरभ्यै नमः ।" ह्या तिच्या षडाक्षरी मंत्राचा लक्ष जप केल्यास मंत्र सिद्ध होतो. हा मंत्र म्हणजे कल्पतरूच आहे.
यजुर्वेदात तिचे ध्यान सांगितले आहे. तिचे पूजन समृद्धी प्राप्त करून देते. तसेच मुक्ती मिळून सर्व मनोरथ पूर्ण होते. कारण ती राधेची सखी आहे. गाईमधील ती पहिली गाय
असून गाईंची अधिदेवता आहे. ही गोमाता पवित्ररूपिणी भक्तांची मनोरथ पूर्ण करणारी असून जगात पवित्र आहे. अशा त्या सुरभी देवीचे मी भजन करतो. असे म्हणून घरात अथवा गाईच्या मस्तकावर, गाय बांधतो त्या खांबावर, शालग्रामामध्ये, पाण्यात, अग्नीत तिचे ब्राह्मणाने पूजन करावे. कार्तिक शुद्ध प्रतिपदेस सकाळी भक्तीयुक्त मनाने तिची पूजा केल्यास तो भूलोकात मान्य होतो. पूर्वी एकदा वराह कल्पात विष्णु मायेच्या प्रभावामुळे सुरभीने त्रैलोक्यातील दूध नाहीसे केले. तेव्हा सर्व देव ब्रह्मदेवाकडे गेले व त्याच्या आज्ञेवरून इंद्राने सुरभीचे स्तवन केले. इंद्र म्हणाला, "हे महादेवी, हे सुरभीदेवी तुला नमस्कार असो, तूच त्रैलोक्यातील गोमातांची बीजरूपी देवता आहेस. तू लक्ष्मीच्या अंशापासून उत्पन्न झालीस. कल्पवृक्षाप्रमाणे सर्वांना प्रिय अशा तुला मी नमस्कार करतो. तू क्षीर, बुद्धी, धन देणारी आहेस, हे देवी, माझा तुला नमस्कार असो. हे शुभदे, तू कल्याणरूपिणी, गाई-बैल उत्पन्न करणारी आहेस. तुला प्रणाम असो. हे देवी, तू यश, कीर्ती, धर्म आहेस. मी तुजपुढे लोटांगण घालतो."
हे स्तोत्र ऐकल्यावर ती गोमाता प्रसन्न झाली व ब्रह्मलोकी इंद्रासमोर प्रकट होऊन तिने महेंद्रास वर दिला. नंतर ती गोलोकी निघून गेली. पुढे विश्वात दुधाची पूर्णता झाली. देवही तृप्त झाले. जो हे स्तोत्र भक्तीने पठण करतो तो गोमान्, धनवान, कीर्तिवान, पुत्रवान् होतो व तीर्थस्नानाचे पुण्य प्राप्त करून घेतो. त्याला यज्ञात दीक्षाग्रहण केल्याचे फळ मिळते. तो शेवटी कृष्णमंदिरी पोहोचतो व कृष्णाची सेवा करतो. तो पुनर्जन्मापासून मुक्त होतो व सुरभीच्या कृपेमुळे तो कृष्णभक्त होतो."
@ देवीभागवत..
============≠==========🙏🏻
*सं- श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*
------------------------------------
नारायण म्हणाले, "ती गाईची अधिदेवता असून ती सुरभी गोलोकातच उत्पन्न झाली. एकदा राधानाथ राधा व गोपिकांसह वृंदावनात गेले. तेथे बराच कालापर्यंत त्यांनी एकांतात विहार केला. तेव्हा भगवंताला दूध प्यावेसे वाटले. त्यावेळी आपल्या डाव्या बाजूतून त्यांनी सुरभीला उत्पन्न केले. ती सवत्स व दुभती धेनू असून तिच्या वत्साला मनोरथ म्हणतात. त्या धेनूला पाहिल्यावर दामाने एका भांडयात तिचे दूध काढले. ते अमृताहूनही मधुर दूध भगवान पिऊ लागले. पण अचानकपणे त्यांच्या हातातून भांडे निसटले व ते जेथे पडले तेथे दुधाचे सरोवर झाले. ते अत्यंत विस्तृत असे शंभर योजनेपर्यंत प्रचंड होते. गोलोकात क्षीरसरोवर म्हणून ते विख्यात आहे.
ते सरोवर गोपी व राधा यांना पुष्करणीइतके प्रिय झाले. त्याचवेळी जेवढे गोप होते तेवढयाच आणखी कित्येक सवत्स कामधेनू सुरभीच्या शरीरातून प्रकट झाल्या. पुढे त्याच्याच संततीने जग व्यापले आहे. प्रथम भगवंताने तिचे पूजन केले. नंतर त्रिभुवनात ती पूजिली जाऊ लागली. कार्तिक शुद्ध प्रतिपदेस त्या सुरभीची पूजा करावी.
"ॐ सुरभ्यै नमः ।" ह्या तिच्या षडाक्षरी मंत्राचा लक्ष जप केल्यास मंत्र सिद्ध होतो. हा मंत्र म्हणजे कल्पतरूच आहे.
यजुर्वेदात तिचे ध्यान सांगितले आहे. तिचे पूजन समृद्धी प्राप्त करून देते. तसेच मुक्ती मिळून सर्व मनोरथ पूर्ण होते. कारण ती राधेची सखी आहे. गाईमधील ती पहिली गाय
असून गाईंची अधिदेवता आहे. ही गोमाता पवित्ररूपिणी भक्तांची मनोरथ पूर्ण करणारी असून जगात पवित्र आहे. अशा त्या सुरभी देवीचे मी भजन करतो. असे म्हणून घरात अथवा गाईच्या मस्तकावर, गाय बांधतो त्या खांबावर, शालग्रामामध्ये, पाण्यात, अग्नीत तिचे ब्राह्मणाने पूजन करावे. कार्तिक शुद्ध प्रतिपदेस सकाळी भक्तीयुक्त मनाने तिची पूजा केल्यास तो भूलोकात मान्य होतो. पूर्वी एकदा वराह कल्पात विष्णु मायेच्या प्रभावामुळे सुरभीने त्रैलोक्यातील दूध नाहीसे केले. तेव्हा सर्व देव ब्रह्मदेवाकडे गेले व त्याच्या आज्ञेवरून इंद्राने सुरभीचे स्तवन केले. इंद्र म्हणाला, "हे महादेवी, हे सुरभीदेवी तुला नमस्कार असो, तूच त्रैलोक्यातील गोमातांची बीजरूपी देवता आहेस. तू लक्ष्मीच्या अंशापासून उत्पन्न झालीस. कल्पवृक्षाप्रमाणे सर्वांना प्रिय अशा तुला मी नमस्कार करतो. तू क्षीर, बुद्धी, धन देणारी आहेस, हे देवी, माझा तुला नमस्कार असो. हे शुभदे, तू कल्याणरूपिणी, गाई-बैल उत्पन्न करणारी आहेस. तुला प्रणाम असो. हे देवी, तू यश, कीर्ती, धर्म आहेस. मी तुजपुढे लोटांगण घालतो."
हे स्तोत्र ऐकल्यावर ती गोमाता प्रसन्न झाली व ब्रह्मलोकी इंद्रासमोर प्रकट होऊन तिने महेंद्रास वर दिला. नंतर ती गोलोकी निघून गेली. पुढे विश्वात दुधाची पूर्णता झाली. देवही तृप्त झाले. जो हे स्तोत्र भक्तीने पठण करतो तो गोमान्, धनवान, कीर्तिवान, पुत्रवान् होतो व तीर्थस्नानाचे पुण्य प्राप्त करून घेतो. त्याला यज्ञात दीक्षाग्रहण केल्याचे फळ मिळते. तो शेवटी कृष्णमंदिरी पोहोचतो व कृष्णाची सेवा करतो. तो पुनर्जन्मापासून मुक्त होतो व सुरभीच्या कृपेमुळे तो कृष्णभक्त होतो."
@ देवीभागवत..
============≠==========🙏🏻
*सं- श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*
No comments:
Post a Comment