*श्राध्ददेव व पितृवर्णन*
--------------------------------
श्राध्दमाहात्म्य :-५..
*हंसवर्णन*
हे राजा, पूर्वजन्मीचा जो पांचिक तो या सातव्या जन्मीही पांचवाच होता. सहावा जो खसृम तो कण्डरीक झाला, व सातवा तो ब्रह्मदत्त झाला, हें मागें सांगितलेंच आहे. उरले जे चार पक्षी तेही कांपिल्य नगरींतच एका वेदवेत्त्या दरिद्री ब्राह्मणाचे पोटीं येऊन सख्खे भाऊ झाले. त्याची नांवे - धृतिमान, सुमना, विद्वान् व सत्यदर्शी अशीं होतीं. हे चौघेही वेदाध्ययनांत मोठे निपुण असून त्यांचें मुक्तिमार्गाकडे सदैव लक्ष असे. कारण, पूर्व संस्कारामुळें त्यांचे ठिकाणी तसलेंच ज्ञान उत्पन्न झालें होतें; यामुळें ते याही जन्मीं सदैव योगनिरत राहून आपण आतां सिद्ध झालों असें त्यांना वाटताच ते हा लोक सोडून जाण्याच्या खटपटीस लागले. जातांना आम्ही येतो म्हणून त्यांनीं आपल्या बापाचा निरोप विचारिला. तेव्हां तो म्हणाला कीं, बाबांनो, तुम्ही पुत्रांनी अशा स्थितींत मला सोडून जाणें हा निव्वळ अधर्म आहे. कारण, माझ्या पोटीं जन्मून माझें दरिद्र तुम्हीं विच्छिन्न केलें नाहीं, किंवा संतति करून वंशवृद्धि केली नाही. माझे पश्चात राहून माझें गयावर्जनादि करणें हें तर लांबच राहिलें, पण, माझी या वृद्ध वयांत सेवाचाकरीही केली नाहीं असें असून मला तुम्ही सोडून चालला, हें तुम्हांला शोभत नाहीं.
हें बापाचे भाषण श्रवण करून ते सर्व ब्राह्मण बापाला म्हणाले कीं, तुम्हाला आत्मोद्धारार्थ संततीची गरज नाहीं. आम्ही ब्रह्मवेत्ते असल्यामुळें तुमचा उद्धार झालेलाच आहे; आतां प्रश्न उरला उपजीविकेचा. त्याची तोड तुम्हाला सांगतो. आपला ब्रह्मदत्त राजा हा मोठा पुण्यवान आहे, तो आपल्या मंत्र्यांसह बसला असेल अशी वेळ साधून त्याकडे जा आणि "सप्तव्याधा" हे श्लोक त्याचे पुढें म्हणा. या श्लोकांत फार गूढार्थ आहे, तो जाणून ब्रह्मदत्त तुम्हावर प्रसन्न होईल व तुम्हाला गांवशीव इनाम देईल, वाटतील तसले भोग्य पदार्थ देईल, फार काय तुमची जी इच्छा असेल ती तृप्त करील. करितां तुम्ही निश्चिंत असा.
याप्रमाणे पित्याला सांगून व त्याची पूजा करून, ते पुन्हा योगधारणा धरून परम शांतीला पोंचले.
=======================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*
--------------------------------
श्राध्दमाहात्म्य :-५..
*हंसवर्णन*
हे राजा, पूर्वजन्मीचा जो पांचिक तो या सातव्या जन्मीही पांचवाच होता. सहावा जो खसृम तो कण्डरीक झाला, व सातवा तो ब्रह्मदत्त झाला, हें मागें सांगितलेंच आहे. उरले जे चार पक्षी तेही कांपिल्य नगरींतच एका वेदवेत्त्या दरिद्री ब्राह्मणाचे पोटीं येऊन सख्खे भाऊ झाले. त्याची नांवे - धृतिमान, सुमना, विद्वान् व सत्यदर्शी अशीं होतीं. हे चौघेही वेदाध्ययनांत मोठे निपुण असून त्यांचें मुक्तिमार्गाकडे सदैव लक्ष असे. कारण, पूर्व संस्कारामुळें त्यांचे ठिकाणी तसलेंच ज्ञान उत्पन्न झालें होतें; यामुळें ते याही जन्मीं सदैव योगनिरत राहून आपण आतां सिद्ध झालों असें त्यांना वाटताच ते हा लोक सोडून जाण्याच्या खटपटीस लागले. जातांना आम्ही येतो म्हणून त्यांनीं आपल्या बापाचा निरोप विचारिला. तेव्हां तो म्हणाला कीं, बाबांनो, तुम्ही पुत्रांनी अशा स्थितींत मला सोडून जाणें हा निव्वळ अधर्म आहे. कारण, माझ्या पोटीं जन्मून माझें दरिद्र तुम्हीं विच्छिन्न केलें नाहीं, किंवा संतति करून वंशवृद्धि केली नाही. माझे पश्चात राहून माझें गयावर्जनादि करणें हें तर लांबच राहिलें, पण, माझी या वृद्ध वयांत सेवाचाकरीही केली नाहीं असें असून मला तुम्ही सोडून चालला, हें तुम्हांला शोभत नाहीं.
हें बापाचे भाषण श्रवण करून ते सर्व ब्राह्मण बापाला म्हणाले कीं, तुम्हाला आत्मोद्धारार्थ संततीची गरज नाहीं. आम्ही ब्रह्मवेत्ते असल्यामुळें तुमचा उद्धार झालेलाच आहे; आतां प्रश्न उरला उपजीविकेचा. त्याची तोड तुम्हाला सांगतो. आपला ब्रह्मदत्त राजा हा मोठा पुण्यवान आहे, तो आपल्या मंत्र्यांसह बसला असेल अशी वेळ साधून त्याकडे जा आणि "सप्तव्याधा" हे श्लोक त्याचे पुढें म्हणा. या श्लोकांत फार गूढार्थ आहे, तो जाणून ब्रह्मदत्त तुम्हावर प्रसन्न होईल व तुम्हाला गांवशीव इनाम देईल, वाटतील तसले भोग्य पदार्थ देईल, फार काय तुमची जी इच्छा असेल ती तृप्त करील. करितां तुम्ही निश्चिंत असा.
याप्रमाणे पित्याला सांगून व त्याची पूजा करून, ते पुन्हा योगधारणा धरून परम शांतीला पोंचले.
=======================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*
No comments:
Post a Comment