*श्राध्ददेव व पितृतर्पण*
---------------------------------
*_भाग :- २.._*
भीष्म उत्तर करितात - "हे अरिमर्दना, पितर ते कोण, आपण ज्यांची पूजा करितों ते शिवाय कोण ? या गोष्टींचा उलगडा पूर्वी एक वेळीं मी माझे परलोकनिवासी पित्याला श्राद्धसमयी पिण्ड देण्यास उद्युक्त झालो असतां माझे पित्याने समक्ष येऊन मला सांगितला आहे तो मी तसाचे तसाच तुला सांगतो; ऐक. चमत्कार असा झाला कीं, मी आपल्या सूत्रग्रंथांत सांगितल्या विधीप्रमाणे भूमीवर दर्भ आंथरून तेथें माझे पित्याचे उद्देशाने पिण्ड ठेवीत असतां एकाएकी तेथील भूमि उकलली, व तींतून आमचे बाबा पूर्वी जिवंत असतां त्यांचा जसा बाहुभूषणे वगैरेनी अलंकृत व रक्तवर्ण अंगुली व तल यांनी युक्त सुंदर हस्त असे तसाचेतसा हात बाहेर आला, व 'या माझे हातावर पिण्ड दे' असे पित्याचे शब्द माझे कानी आले. ते ऐकून मी चपापून म्हटलें, 'अरेरे, मी विचार न करितां दर्भावरच पिण्ड ठेवीत होतों' ही मोठी चूक होत होती. बाकी तेथें माझा तरी काय इलाज ? बौधायन सूत्रात जो श्राद्धविधि सांगितला आहे त्यांत असा प्रत्यक्ष हात येतो असे कोठेही सांगितलें नाहीं. असो, माझे हे बोल ऐकून व मीं दिलेला पिण्ड घेऊन माझा पिता प्रसन्न होऊन बहुत गोड शब्दांनीं मला म्हणाला, कीं, बाबारे, तुझेसारखा धर्मज्ञ व ज्ञाता सत्पुत्र माझे पोटीं आल्याने मी इहपरलोकी कृतार्थ झालो आहें. हे निष्पापा, तूं मोठा दृढव्रत आहेस असें पाहून या लोकात (तुझे द्वारे) धर्माचे कामी व्यवस्था लावावी म्हणून तू जे आतां मला प्रश्न विचारिलेस ते प्रश्न विचारण्याची बुद्धि मींच तुझे ठिकाणी उत्पन्न केली; कारण एक तर धर्माचे बाबतींत राजा जी गोष्ट प्रमाण धरून चालतो, तीच प्रमाण धरून प्रजाही राजाचें अनुकरण करितात; शिवाय जो कोणी धर्माचें रक्षण करितो त्याला प्रजांच्या सत्क्रियांचे चतुर्थांश फल मिळतें. त्याचे उलट जो मूर्ख राजा प्रजांचे धर्मरक्षण करीत नाही त्याला त्यांच्या पापाचा चतुर्थांश भोगावा लागतो; परंतु, हे भीष्मा, तूं अनादिसिद्ध चालत आलेले जे वेद धर्म तेच प्रमाण धरून चालला आहेस हे पाहून मला तुजविषयीं निरुपम प्रेम उत्पन्न झालें आहे, व यामुळे मी तुजवर प्रसन्न होऊन केवळ आपखुषीनें तुला त्रैलोक्यांतही अन्यत्र न मिळणारा असा वर देतो, तो ऐक. "तुझे मनांत जगवत्काल जगावें असे असेल तावत्काल मृत्यूचा अंमल तुजवर चालणार नाही, तुझी जेव्हा परवानगी मिळेल तेव्हां मग मृत्यूचा शक तुझेवर चालू होईल, याशिवाय तुला आणखी कांहीं मागावयाचे असलें तर, हे भरतश्रेष्ठा, तुझे मनांत असेल तें निःशंक माग, मी द्यावयास तयार आहें."
भीष्म म्हणतात - "हे युधिष्ठिरा, याप्रमाणे बाबा बोलले असतां मी त्यांस अभिवादन करून हात जोडून म्हटले कीं, आपली अशी मजवर कृपा झाली, त्याअर्थी, हे पुरुषश्रेष्ठा, मी आज कृतकृत्य झालो; तथापि, मी आणखीही आपणापासून कांहीं मागून घेण्यास पात्र आहें असें ज्या अर्थीं आपण म्हणतां त्या अर्थी आपण होऊनच मघाशी ज्याचा अंशतः निर्देश केला होता तो प्रश्न मी आपणास सविस्तर पुसणार आहें. तेव्हां माझा धर्मनिष्ठ पिता मला म्हणाला, "तुझ्या मनांत येईल तो प्रश्न मला खुशाल विचार, तूं वाटेल ती शंका काढ. तिचा उलगडा करण्यास मी समर्थ आहें."
........क्रमश:.....*
======================
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*
---------------------------------
*_भाग :- २.._*
भीष्म उत्तर करितात - "हे अरिमर्दना, पितर ते कोण, आपण ज्यांची पूजा करितों ते शिवाय कोण ? या गोष्टींचा उलगडा पूर्वी एक वेळीं मी माझे परलोकनिवासी पित्याला श्राद्धसमयी पिण्ड देण्यास उद्युक्त झालो असतां माझे पित्याने समक्ष येऊन मला सांगितला आहे तो मी तसाचे तसाच तुला सांगतो; ऐक. चमत्कार असा झाला कीं, मी आपल्या सूत्रग्रंथांत सांगितल्या विधीप्रमाणे भूमीवर दर्भ आंथरून तेथें माझे पित्याचे उद्देशाने पिण्ड ठेवीत असतां एकाएकी तेथील भूमि उकलली, व तींतून आमचे बाबा पूर्वी जिवंत असतां त्यांचा जसा बाहुभूषणे वगैरेनी अलंकृत व रक्तवर्ण अंगुली व तल यांनी युक्त सुंदर हस्त असे तसाचेतसा हात बाहेर आला, व 'या माझे हातावर पिण्ड दे' असे पित्याचे शब्द माझे कानी आले. ते ऐकून मी चपापून म्हटलें, 'अरेरे, मी विचार न करितां दर्भावरच पिण्ड ठेवीत होतों' ही मोठी चूक होत होती. बाकी तेथें माझा तरी काय इलाज ? बौधायन सूत्रात जो श्राद्धविधि सांगितला आहे त्यांत असा प्रत्यक्ष हात येतो असे कोठेही सांगितलें नाहीं. असो, माझे हे बोल ऐकून व मीं दिलेला पिण्ड घेऊन माझा पिता प्रसन्न होऊन बहुत गोड शब्दांनीं मला म्हणाला, कीं, बाबारे, तुझेसारखा धर्मज्ञ व ज्ञाता सत्पुत्र माझे पोटीं आल्याने मी इहपरलोकी कृतार्थ झालो आहें. हे निष्पापा, तूं मोठा दृढव्रत आहेस असें पाहून या लोकात (तुझे द्वारे) धर्माचे कामी व्यवस्था लावावी म्हणून तू जे आतां मला प्रश्न विचारिलेस ते प्रश्न विचारण्याची बुद्धि मींच तुझे ठिकाणी उत्पन्न केली; कारण एक तर धर्माचे बाबतींत राजा जी गोष्ट प्रमाण धरून चालतो, तीच प्रमाण धरून प्रजाही राजाचें अनुकरण करितात; शिवाय जो कोणी धर्माचें रक्षण करितो त्याला प्रजांच्या सत्क्रियांचे चतुर्थांश फल मिळतें. त्याचे उलट जो मूर्ख राजा प्रजांचे धर्मरक्षण करीत नाही त्याला त्यांच्या पापाचा चतुर्थांश भोगावा लागतो; परंतु, हे भीष्मा, तूं अनादिसिद्ध चालत आलेले जे वेद धर्म तेच प्रमाण धरून चालला आहेस हे पाहून मला तुजविषयीं निरुपम प्रेम उत्पन्न झालें आहे, व यामुळे मी तुजवर प्रसन्न होऊन केवळ आपखुषीनें तुला त्रैलोक्यांतही अन्यत्र न मिळणारा असा वर देतो, तो ऐक. "तुझे मनांत जगवत्काल जगावें असे असेल तावत्काल मृत्यूचा अंमल तुजवर चालणार नाही, तुझी जेव्हा परवानगी मिळेल तेव्हां मग मृत्यूचा शक तुझेवर चालू होईल, याशिवाय तुला आणखी कांहीं मागावयाचे असलें तर, हे भरतश्रेष्ठा, तुझे मनांत असेल तें निःशंक माग, मी द्यावयास तयार आहें."
भीष्म म्हणतात - "हे युधिष्ठिरा, याप्रमाणे बाबा बोलले असतां मी त्यांस अभिवादन करून हात जोडून म्हटले कीं, आपली अशी मजवर कृपा झाली, त्याअर्थी, हे पुरुषश्रेष्ठा, मी आज कृतकृत्य झालो; तथापि, मी आणखीही आपणापासून कांहीं मागून घेण्यास पात्र आहें असें ज्या अर्थीं आपण म्हणतां त्या अर्थी आपण होऊनच मघाशी ज्याचा अंशतः निर्देश केला होता तो प्रश्न मी आपणास सविस्तर पुसणार आहें. तेव्हां माझा धर्मनिष्ठ पिता मला म्हणाला, "तुझ्या मनांत येईल तो प्रश्न मला खुशाल विचार, तूं वाटेल ती शंका काढ. तिचा उलगडा करण्यास मी समर्थ आहें."
........क्रमश:.....*
======================
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*
No comments:
Post a Comment