*वज्रगोपिकानाम*
--------------------------
भाग :- ३..
भारतातील सर्व प्रांतातील व सर्व भाषांतील भक्तिप्रधान काव्यातून व भक्तिमार्गीय संतांच्या काव्यातून गोपिकांच्या भक्तीचे विशेष वर्णन आढळून येते. महाराष्ट्रातील भागवतधर्मीय सर्व संतांनी आपआपल्या काव्यग्रंथातून, अभंगांतून गोपिकांचे, त्यांच्या भक्तीचे अत्यंत प्रेमपूर्वक रसाळ वर्णन केलेले आढळून येते. श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या वर्णनाची 'ज्ञानियाचा राजा,' 'ज्ञानियाचा शिरोमणि,' 'ज्ञानचक्रवर्ति,' "गुरुमहारावो" अशा अनेक श्रेष्ठ श्रेष्ठ विशेषणांनी सर्वच साधुसंत विद्वानपंडितांनीही गौरव गाथा गाइली आहे. ज्ञानेश्वरी अनुभवामृतादिकांतून त्यांनी पूर्णाद्वैताचे तत्त्वज्ञान पटवून दिले आहे. आपल्या अभंगात गोकुळवासी गोपिकांचे वर्णन केले आहे. त्याचे गौळणी, विरहिणी, सौरी अंबुला हे अभंग सर्व या गोपीभावाच्या महात्म्यानेच भरले आहेत. त्याला मोठा अध्यात्माचा, प्रेमाचा साजही त्यांनी चढविला आहे. विशेष म्हणजे त्यांनी केवळ परोक्षरूपाने गोपिकांचे वर्णन केले नसून स्वतःच्या वृत्तीमध्ये गोपीभावाचा अंगीकार करून गोपिकांचे जीवन साकार केले आहे. ते म्हणतात,
*निवृत्तिप्रसादे मी गोवळिये वो ।*
*माझा भाव तो विठ्ठलु न्याहाळिये वो ॥*
अशी अनेक वचने आहेत. तसेच श्रीनामदेवराय, श्रीएकनाथ महाराज, श्रीतुकाराम महाराज, निळोबाराय यांच्या अभंगाच्या गाथ्यात प्रारंभीच बाळक्रीडा हे प्रकरण आहे व त्यात सर्व कृष्णलीलांचे विस्तृत वर्णन केलेले आहे. त्यात प्रामुख्याने गोपिकांच्या प्रेमाचे वर्णन केलेले आढळते.
श्रीनारद आपल्या भक्तिलक्षणाकरिता ज्या गोपिकांचे उदाहरण घेतात, त्याचे श्रेष्ठत्व आतापावेतो पाहिले. नारदाचे भक्तिलक्षण ' *तदर्पिताखिलाचारिता तद्विस्मरणे परमव्याकुलता'* हे गोपिकांच्या चरित्रात त्यांना पूर्णरूपाने दिसून आले. स्वतः श्रीकृष्ण भगवानच गोपिकांच्या प्रेमनिमग्न अवस्थेचे वर्णन करतात.
*तानाविदन्मय्यनुषङ्गः बद्धधिय स्वमात्मानमथस्तथेदम् । *
*यथा समाधौ मुनयोऽब्धितोये नद्य प्रविष्टा इव नामरूपे ॥ भा. ११ - १२ - १२*
'समाधी अवस्थेमध्ये ज्याप्रमाणे योग्याना दृश्य नामरूपाचे भान राहात नाही, महासागरामध्ये प्रविष्ट झालेल्या नद्यांना निराळे अस्तित्व राहात नाही, त्याप्रमाणे प्रेमातिशयाने ज्यांची अंतःकरणे माझ्याच ठिकाणी एकरूप झाली आहेत, अशा गोपींना आपला देह, आपला जीव, पतिपुत्रादिक लोक-परलोक याचीही जाणीव राहिली नव्हती. सर्वांचाच त्यांना पूर्ण विसर पडला होता.' त्यांचा सर्व आचार भगवत्पर कसा झाला होता याचे वर्णन श्रीएकनाथ महाराजांनी आपल्या टीकेतून विस्तृत आणि सुंदर केले आहे.
*ऐसिया मजलागी आसक्त । माझ्या ठायी अनन्यचित्त ॥ *
विसरल्या देहसुखें समस्त । अति अनुरक्त मजलागी ॥
करिता दळण कांडण । माझे दीर्घस्वरें गाती गुण ।
की आदरिल्या दधिमंथन । माझे चरित्रगायन त्या करिती ॥
करितां सडासंमार्जन । गोपिकासी माझे ध्यान ।
माझेनि स्मरणे जाण । परिये देणे बालका ॥
गाईचें दोहन करिता । माझें स्मरणी आसक्तता ।
एवं सर्व कर्मी वर्ततां । माझ्या विसराची वार्ता विसरल्या ॥
करितां गमनागमन । अखंड माझ्या ठायीं मन ।
आसन भोजन प्राशन । करिता मद्ध्यान तयासी ।
ऐसी अनन्य ठायीच्या ठायी । गोपिकांसी माझी प्रीति पाही ।
त्या वर्तताही देहगेही । माझ्या ठायी विनटल्या ॥
या परी बुद्धी मदाकार । म्हणोनि विसरल्या घरदार ।
विसरल्या पुत्र भ्रतार । निज व्यापार विसरल्या ॥
विसरल्या विषयसुख । विसरल्या द्वंद्व दुःख ।
विसरल्या तहानभूक । माझेनि एक निदिध्यासे ॥
जेणें देहे पति-पुत्रांते । आप्त मानिले होतें चित्ते ।
तें चित्त रातलें मातें । त्या देहातें विसरोनि ॥
विसरल्या इह-लोक परलोक । विसरल्या कार्यकारण निःशेख ।
विसरल्या नामरूप देख । माझे ध्यान सुख भोगितां ॥
जेवी का नाना सरिता । आलिया सिधूतें ठाकिता ।
तेथे पावोनि समरसता । नामरूपता विसरल्या ॥
तेवी गोपिका अनन्यप्रीती । माझी लाहोनिया प्राप्ती ।
*नामरूपाची व्युत्पत्ति । विसरल्या स्फूर्ती स्फुरेना ॥*
नाथ भागवत अ. १३ - १२
......क्रमश.....
=======================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*
--------------------------
भाग :- ३..
भारतातील सर्व प्रांतातील व सर्व भाषांतील भक्तिप्रधान काव्यातून व भक्तिमार्गीय संतांच्या काव्यातून गोपिकांच्या भक्तीचे विशेष वर्णन आढळून येते. महाराष्ट्रातील भागवतधर्मीय सर्व संतांनी आपआपल्या काव्यग्रंथातून, अभंगांतून गोपिकांचे, त्यांच्या भक्तीचे अत्यंत प्रेमपूर्वक रसाळ वर्णन केलेले आढळून येते. श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या वर्णनाची 'ज्ञानियाचा राजा,' 'ज्ञानियाचा शिरोमणि,' 'ज्ञानचक्रवर्ति,' "गुरुमहारावो" अशा अनेक श्रेष्ठ श्रेष्ठ विशेषणांनी सर्वच साधुसंत विद्वानपंडितांनीही गौरव गाथा गाइली आहे. ज्ञानेश्वरी अनुभवामृतादिकांतून त्यांनी पूर्णाद्वैताचे तत्त्वज्ञान पटवून दिले आहे. आपल्या अभंगात गोकुळवासी गोपिकांचे वर्णन केले आहे. त्याचे गौळणी, विरहिणी, सौरी अंबुला हे अभंग सर्व या गोपीभावाच्या महात्म्यानेच भरले आहेत. त्याला मोठा अध्यात्माचा, प्रेमाचा साजही त्यांनी चढविला आहे. विशेष म्हणजे त्यांनी केवळ परोक्षरूपाने गोपिकांचे वर्णन केले नसून स्वतःच्या वृत्तीमध्ये गोपीभावाचा अंगीकार करून गोपिकांचे जीवन साकार केले आहे. ते म्हणतात,
*निवृत्तिप्रसादे मी गोवळिये वो ।*
*माझा भाव तो विठ्ठलु न्याहाळिये वो ॥*
अशी अनेक वचने आहेत. तसेच श्रीनामदेवराय, श्रीएकनाथ महाराज, श्रीतुकाराम महाराज, निळोबाराय यांच्या अभंगाच्या गाथ्यात प्रारंभीच बाळक्रीडा हे प्रकरण आहे व त्यात सर्व कृष्णलीलांचे विस्तृत वर्णन केलेले आहे. त्यात प्रामुख्याने गोपिकांच्या प्रेमाचे वर्णन केलेले आढळते.
श्रीनारद आपल्या भक्तिलक्षणाकरिता ज्या गोपिकांचे उदाहरण घेतात, त्याचे श्रेष्ठत्व आतापावेतो पाहिले. नारदाचे भक्तिलक्षण ' *तदर्पिताखिलाचारिता तद्विस्मरणे परमव्याकुलता'* हे गोपिकांच्या चरित्रात त्यांना पूर्णरूपाने दिसून आले. स्वतः श्रीकृष्ण भगवानच गोपिकांच्या प्रेमनिमग्न अवस्थेचे वर्णन करतात.
*तानाविदन्मय्यनुषङ्गः बद्धधिय स्वमात्मानमथस्तथेदम् । *
*यथा समाधौ मुनयोऽब्धितोये नद्य प्रविष्टा इव नामरूपे ॥ भा. ११ - १२ - १२*
'समाधी अवस्थेमध्ये ज्याप्रमाणे योग्याना दृश्य नामरूपाचे भान राहात नाही, महासागरामध्ये प्रविष्ट झालेल्या नद्यांना निराळे अस्तित्व राहात नाही, त्याप्रमाणे प्रेमातिशयाने ज्यांची अंतःकरणे माझ्याच ठिकाणी एकरूप झाली आहेत, अशा गोपींना आपला देह, आपला जीव, पतिपुत्रादिक लोक-परलोक याचीही जाणीव राहिली नव्हती. सर्वांचाच त्यांना पूर्ण विसर पडला होता.' त्यांचा सर्व आचार भगवत्पर कसा झाला होता याचे वर्णन श्रीएकनाथ महाराजांनी आपल्या टीकेतून विस्तृत आणि सुंदर केले आहे.
*ऐसिया मजलागी आसक्त । माझ्या ठायी अनन्यचित्त ॥ *
विसरल्या देहसुखें समस्त । अति अनुरक्त मजलागी ॥
करिता दळण कांडण । माझे दीर्घस्वरें गाती गुण ।
की आदरिल्या दधिमंथन । माझे चरित्रगायन त्या करिती ॥
करितां सडासंमार्जन । गोपिकासी माझे ध्यान ।
माझेनि स्मरणे जाण । परिये देणे बालका ॥
गाईचें दोहन करिता । माझें स्मरणी आसक्तता ।
एवं सर्व कर्मी वर्ततां । माझ्या विसराची वार्ता विसरल्या ॥
करितां गमनागमन । अखंड माझ्या ठायीं मन ।
आसन भोजन प्राशन । करिता मद्ध्यान तयासी ।
ऐसी अनन्य ठायीच्या ठायी । गोपिकांसी माझी प्रीति पाही ।
त्या वर्तताही देहगेही । माझ्या ठायी विनटल्या ॥
या परी बुद्धी मदाकार । म्हणोनि विसरल्या घरदार ।
विसरल्या पुत्र भ्रतार । निज व्यापार विसरल्या ॥
विसरल्या विषयसुख । विसरल्या द्वंद्व दुःख ।
विसरल्या तहानभूक । माझेनि एक निदिध्यासे ॥
जेणें देहे पति-पुत्रांते । आप्त मानिले होतें चित्ते ।
तें चित्त रातलें मातें । त्या देहातें विसरोनि ॥
विसरल्या इह-लोक परलोक । विसरल्या कार्यकारण निःशेख ।
विसरल्या नामरूप देख । माझे ध्यान सुख भोगितां ॥
जेवी का नाना सरिता । आलिया सिधूतें ठाकिता ।
तेथे पावोनि समरसता । नामरूपता विसरल्या ॥
तेवी गोपिका अनन्यप्रीती । माझी लाहोनिया प्राप्ती ।
*नामरूपाची व्युत्पत्ति । विसरल्या स्फूर्ती स्फुरेना ॥*
नाथ भागवत अ. १३ - १२
......क्रमश.....
=======================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*
No comments:
Post a Comment