*श्राध्ददेव व पितृवर्णन*
--------------------------------
भाग :- ६..
*चटकोपाख्यान*
वैरी म्हटला म्हणजे तो, मनुष्य निद्रिस्त आहे हें पाहात नाहीं. तो निशेंत आहे किंवा गैरसावध आहे, हें पाहात नाहीं; आणि वाटेल त्या उपायांनी - विषप्रयोगानें म्हणा, आग घालून म्हणा, किंवा साधल्यास शस्त्रानें किंवा ठकबाजीनें - त्याचा घात करितो, व त्याची मुळी शिल्लक राहिल्यास अंकुरित होऊन पुन्हा आपणांस त्रास देईल, यास्तव त्याचा उच्छेद करतो, काहीही शिल्लक उरूं देत नाही. कारण, शत्रुशेष, ऋणशेष व अग्निशेष ही पुनरपि वाढतात. यास्तव शहाण्याने तीं शिल्लक ठेवूं नयेत, हा दाखला त्यांचे ध्यानांत असतो. लबाड शत्रु आपले बरोबर हंसतो, अघळपघळ बोलतो, एका बैठकीवर बसतो व एका ताटांत जेवतो देखील. पण हें सर्व करितांना त्याची पापबुद्धि कायम असते. एकदा शत्रुत्व उत्पन्न झालें म्हणजे मग तो शत्रु आपला शरीरसंबंधी असला तरीही त्यावर विसंबू नये. कारण, इंद्राने लढाईत प्रत्यक्ष आपला सासरा म्हणजे बायकोचा बाप जो पुलोमा त्याला ठार केलें.
मनांत वैरभाव ठेवून जो मनुष्य वरवर गोड बोलतो त्याच्याजवळ जाणें म्हणजे हरिणानें फांसेपारध्याजवळ जाण्यापैकींच आहे. ज्याच्या मनांत आपल्याविषयीं काळें आलें असल्या बलाढय शत्रूच्या आश्रयाला कधीही राहू नये. कारण, नदीचा वेगवान ओघ कांठाच्या वृक्षाला ज्याप्रमाणें खणून काढितो, त्याप्रमाणें तो आपला नाश करितो. शत्रूपासून जरी आपण उदयांस आलों असलो तरी त्यावर भरंवसा ठेवूं नये. कारण, ज्याप्रमाणें एखादा किडा पंख फुटल्याच्या आनंदाने वर उडी मारावयास जातो, परंतु इतक्यांत पक्ष्यांची नजर त्याजवर जाऊन ते त्याला ठार मारतात, त्याप्रमाणें अवस्था होते.
याप्रमाणे शुक्राचार्यांनी आपल्या नीतीत ही जी अनेक बोध-वाक्यें लिहिली आहेत, ती, हे भूपाला, ज्या सुज्ञ पुरुषाला आपण सुरक्षित नांदावे अशी इच्छा असेल त्यानें मनांत धरावी. मी तर तुझ्या साक्षात पुत्राचे डोळे फोडण्यासारखें अतिदारुण पाप केलें आहे, तेव्हां आतां तुझ्यावर विश्वास ठेवून तूं म्हणतोस तसें तुझ्या घरांत स्वस्थ राहाणे माझ्या हातून होणार नाहीं." असें म्हणून ती चिमणी आकाशांत उडून गेली.
भीष्म म्हणतात - हे युधिष्ठिरा, राजा ब्रह्मदत्त व पूजनिया चिमणी यांचा घडलेला वृत्तांत मीं तुला सांगितला. आतां तुला श्राद्धाची माहिती पाहिजे आहे तर तिजसाठीं पूर्वी सनत्कुमारांनी मार्कंडेयाचे प्रश्नावरून त्याला एक जुनाट इतिहास सांगितला होता, तो मी तुला सांगतो. आपले हातून पुण्य घडावे व आपणांस श्राद्धाचे फल मिळावें, अशा उद्देशाने वागणारे योगनिष्ठ ब्रह्मचारी जे गालव, कंडरीक व ब्रह्मदत्त, या तिघांचे सातवे जन्मांत हा इतिहास घडलेला आहे. =======================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*
--------------------------------
भाग :- ६..
*चटकोपाख्यान*
वैरी म्हटला म्हणजे तो, मनुष्य निद्रिस्त आहे हें पाहात नाहीं. तो निशेंत आहे किंवा गैरसावध आहे, हें पाहात नाहीं; आणि वाटेल त्या उपायांनी - विषप्रयोगानें म्हणा, आग घालून म्हणा, किंवा साधल्यास शस्त्रानें किंवा ठकबाजीनें - त्याचा घात करितो, व त्याची मुळी शिल्लक राहिल्यास अंकुरित होऊन पुन्हा आपणांस त्रास देईल, यास्तव त्याचा उच्छेद करतो, काहीही शिल्लक उरूं देत नाही. कारण, शत्रुशेष, ऋणशेष व अग्निशेष ही पुनरपि वाढतात. यास्तव शहाण्याने तीं शिल्लक ठेवूं नयेत, हा दाखला त्यांचे ध्यानांत असतो. लबाड शत्रु आपले बरोबर हंसतो, अघळपघळ बोलतो, एका बैठकीवर बसतो व एका ताटांत जेवतो देखील. पण हें सर्व करितांना त्याची पापबुद्धि कायम असते. एकदा शत्रुत्व उत्पन्न झालें म्हणजे मग तो शत्रु आपला शरीरसंबंधी असला तरीही त्यावर विसंबू नये. कारण, इंद्राने लढाईत प्रत्यक्ष आपला सासरा म्हणजे बायकोचा बाप जो पुलोमा त्याला ठार केलें.
मनांत वैरभाव ठेवून जो मनुष्य वरवर गोड बोलतो त्याच्याजवळ जाणें म्हणजे हरिणानें फांसेपारध्याजवळ जाण्यापैकींच आहे. ज्याच्या मनांत आपल्याविषयीं काळें आलें असल्या बलाढय शत्रूच्या आश्रयाला कधीही राहू नये. कारण, नदीचा वेगवान ओघ कांठाच्या वृक्षाला ज्याप्रमाणें खणून काढितो, त्याप्रमाणें तो आपला नाश करितो. शत्रूपासून जरी आपण उदयांस आलों असलो तरी त्यावर भरंवसा ठेवूं नये. कारण, ज्याप्रमाणें एखादा किडा पंख फुटल्याच्या आनंदाने वर उडी मारावयास जातो, परंतु इतक्यांत पक्ष्यांची नजर त्याजवर जाऊन ते त्याला ठार मारतात, त्याप्रमाणें अवस्था होते.
याप्रमाणे शुक्राचार्यांनी आपल्या नीतीत ही जी अनेक बोध-वाक्यें लिहिली आहेत, ती, हे भूपाला, ज्या सुज्ञ पुरुषाला आपण सुरक्षित नांदावे अशी इच्छा असेल त्यानें मनांत धरावी. मी तर तुझ्या साक्षात पुत्राचे डोळे फोडण्यासारखें अतिदारुण पाप केलें आहे, तेव्हां आतां तुझ्यावर विश्वास ठेवून तूं म्हणतोस तसें तुझ्या घरांत स्वस्थ राहाणे माझ्या हातून होणार नाहीं." असें म्हणून ती चिमणी आकाशांत उडून गेली.
भीष्म म्हणतात - हे युधिष्ठिरा, राजा ब्रह्मदत्त व पूजनिया चिमणी यांचा घडलेला वृत्तांत मीं तुला सांगितला. आतां तुला श्राद्धाची माहिती पाहिजे आहे तर तिजसाठीं पूर्वी सनत्कुमारांनी मार्कंडेयाचे प्रश्नावरून त्याला एक जुनाट इतिहास सांगितला होता, तो मी तुला सांगतो. आपले हातून पुण्य घडावे व आपणांस श्राद्धाचे फल मिळावें, अशा उद्देशाने वागणारे योगनिष्ठ ब्रह्मचारी जे गालव, कंडरीक व ब्रह्मदत्त, या तिघांचे सातवे जन्मांत हा इतिहास घडलेला आहे. =======================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*
No comments:
Post a Comment