*कामक्रोध व अहंकार*
-------------------------------
*काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवः । *
*महाशनो महापाप्मा विद्ध्येनमिह वैरिणम् ॥*
गीता ३-३७
'श्रीकृष्ण म्हणतात, हा काम हा क्रोध आहे, रजोगुणापासून उत्पन्न झालेला हा आधाशी व महापापी आहे, या लोकी हा आपला वैरी आहे असे जाण.' या श्लोकावरील श्री ज्ञानेश्वर महाराजांची विस्तृत टीका फार मननीय आहे, त्या ओव्याचा भावार्थ खाली देत आहो.
"हे अर्जुना ! जीवाला पाप करावयास लावून दुःखात ढकलणारे हे कामक्रोध आहेत असे समज. याचेजवळ दयेचा साठा मुळीच नाही. हे प्रत्यक्ष यमधर्म (काळ) आहेत. हे ज्ञानरूपी ठेव्यावर असलेले भुजंग आहेत. हे विषयदरीतील व्याघ्र आहेत. हे भजनरूपी मार्गावर वाटमारेपणा करणारे आहेत. यांची मृत्यूच्या नगरात चांगली पत आहे, कारण हे जीविताचे शत्रू आहेत. याना भूक लागली असता खाण्यास हे जग एका घासासही पुरत नाही. सहज मुठीत धरण्यास जिला चौदा भुवनेही थोडी आहेत अशी भ्रांती ती याची नव्या नवसाची बहीण आहे, जी खेळत असता त्रैलोक्यरूप खाऊ सहज खाऊन टाकते, त्या भ्रांतीच्या दासीपणाचे जोरावर ही तृष्णा जगली आहे. या कामक्रोधाना मोहाचे घरी मान आहे. आपल्या कौशल्याने जो सर्व जगास नाचवितो तो अहंकार या कामक्रोधापाशी देवघेव करतो. ज्याने सत्याच्या पोटी असलेला मालमसाला काढून त्याऐवजी असत्याचा पेंढा भरला असा जो दंभ तो या कामक्रोधानी जगात प्रसिद्धीस आणला. यानी पतिव्रता शांती तिला वस्त्रहीन केले, मग त्या वस्त्रानी मायारूपी मांगीण सजविली अशा या सजविलेल्या मायेकडून साधूचे समुदाय या कामक्रोधानी भ्रष्ट करविले. यांनी विवेकाचा आधारच नष्ट केला. वैराग्याची तर कातडीच सोलून काढली व निग्रहाची जीवंतपणीच मान मुरगळून टाकली. या कामक्रोधानी संतोषरूप अरण्यच तोडून टाकले व धैर्यरूप किल्ले पाडले आणि आनंदरूपी रोपटे उपटून फेकून दिले. यानी बोधाची रोपेही उपटली, सुखाची तर भाषाही पुसून टाकली व हृदयात सर्वत्र त्रिविध तापाचे निखारे पसरले. हे पाण्यावाचून बुडविणारे, अग्निवाचून जाळणारे व न बोलता अकस्मात प्राणिमात्राना घेरणार आहेत. अर्जुना ! हे शस्त्राविना मारतात, दोरावाचून बांधतात आणि ज्ञान्याचाही प्रतिज्ञापूर्वक वध करतात. (ज्ञानेश्वरी अ. ३ ओवी २४० ते ५८ भावार्थ.)
तसेच गीतेच्या सोळाव्या अध्यायाच्या शेवटी तर या कामक्रोधादिकाना नरकाचे द्वार म्हटले आहे.
*त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः । *
*कामःक्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्रयं त्यजेत ॥*
गीता १६-२१
'काम-क्रोध-लोभरूपी तीन प्रकारचे हे नरकाचे द्वार आहे व आत्म्याचा नाश करणारे आहे, म्हणून या तिघांचा त्याग करावा.'
=======================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*
-------------------------------
*काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवः । *
*महाशनो महापाप्मा विद्ध्येनमिह वैरिणम् ॥*
गीता ३-३७
'श्रीकृष्ण म्हणतात, हा काम हा क्रोध आहे, रजोगुणापासून उत्पन्न झालेला हा आधाशी व महापापी आहे, या लोकी हा आपला वैरी आहे असे जाण.' या श्लोकावरील श्री ज्ञानेश्वर महाराजांची विस्तृत टीका फार मननीय आहे, त्या ओव्याचा भावार्थ खाली देत आहो.
"हे अर्जुना ! जीवाला पाप करावयास लावून दुःखात ढकलणारे हे कामक्रोध आहेत असे समज. याचेजवळ दयेचा साठा मुळीच नाही. हे प्रत्यक्ष यमधर्म (काळ) आहेत. हे ज्ञानरूपी ठेव्यावर असलेले भुजंग आहेत. हे विषयदरीतील व्याघ्र आहेत. हे भजनरूपी मार्गावर वाटमारेपणा करणारे आहेत. यांची मृत्यूच्या नगरात चांगली पत आहे, कारण हे जीविताचे शत्रू आहेत. याना भूक लागली असता खाण्यास हे जग एका घासासही पुरत नाही. सहज मुठीत धरण्यास जिला चौदा भुवनेही थोडी आहेत अशी भ्रांती ती याची नव्या नवसाची बहीण आहे, जी खेळत असता त्रैलोक्यरूप खाऊ सहज खाऊन टाकते, त्या भ्रांतीच्या दासीपणाचे जोरावर ही तृष्णा जगली आहे. या कामक्रोधाना मोहाचे घरी मान आहे. आपल्या कौशल्याने जो सर्व जगास नाचवितो तो अहंकार या कामक्रोधापाशी देवघेव करतो. ज्याने सत्याच्या पोटी असलेला मालमसाला काढून त्याऐवजी असत्याचा पेंढा भरला असा जो दंभ तो या कामक्रोधानी जगात प्रसिद्धीस आणला. यानी पतिव्रता शांती तिला वस्त्रहीन केले, मग त्या वस्त्रानी मायारूपी मांगीण सजविली अशा या सजविलेल्या मायेकडून साधूचे समुदाय या कामक्रोधानी भ्रष्ट करविले. यांनी विवेकाचा आधारच नष्ट केला. वैराग्याची तर कातडीच सोलून काढली व निग्रहाची जीवंतपणीच मान मुरगळून टाकली. या कामक्रोधानी संतोषरूप अरण्यच तोडून टाकले व धैर्यरूप किल्ले पाडले आणि आनंदरूपी रोपटे उपटून फेकून दिले. यानी बोधाची रोपेही उपटली, सुखाची तर भाषाही पुसून टाकली व हृदयात सर्वत्र त्रिविध तापाचे निखारे पसरले. हे पाण्यावाचून बुडविणारे, अग्निवाचून जाळणारे व न बोलता अकस्मात प्राणिमात्राना घेरणार आहेत. अर्जुना ! हे शस्त्राविना मारतात, दोरावाचून बांधतात आणि ज्ञान्याचाही प्रतिज्ञापूर्वक वध करतात. (ज्ञानेश्वरी अ. ३ ओवी २४० ते ५८ भावार्थ.)
तसेच गीतेच्या सोळाव्या अध्यायाच्या शेवटी तर या कामक्रोधादिकाना नरकाचे द्वार म्हटले आहे.
*त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः । *
*कामःक्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्रयं त्यजेत ॥*
गीता १६-२१
'काम-क्रोध-लोभरूपी तीन प्रकारचे हे नरकाचे द्वार आहे व आत्म्याचा नाश करणारे आहे, म्हणून या तिघांचा त्याग करावा.'
=======================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*
No comments:
Post a Comment