श्राध्ददेव व पितृवर्णन:-
-------------------------
चटकोपाख्यान:-२
धर्मराज म्हणतो - महाराज, हा उग्रायुध कोणाचा पुत्र, कोणच्या कुळांत जन्मला व आपण त्याला युद्धांत काय म्हणून मारिले, हें सर्व मला सांगा.
भीष्म सांगतात - बाबारे, मागें जो अजमीढ राजा सांगितला, त्याला यवीनर नांवाचा एक विद्वान पुत्र होता; यवीनराचे पोटीं धृतिमान झाला; धृतिमानाचा पुत्र सत्यधृति, सत्यधृतीचे उदरी प्रतापशाली दृढनेमी हा जन्मला. पुढें राजा सुधर्मा हा दृढनेमीचा पुत्र झाला. सुधर्म्याला पुढें सार्वभौम राजा हा पुत्र झाला. याला सार्वभौम म्हणण्याचें कारण खरोखरच तो सर्व पृथ्वीचा मालक झाला होता. याच्या सुप्रसिद्ध वंशांत पुढें पौरवांना आनंद देणारा महान नांवाचा राजा झाला; पुढें महानाला रुक्मरथ झाला, असे लिहिले आहे. रुक्मरथाचा पुत्र सुपार्श्व, सुपार्श्वाचा पुत्र सुमति हा मोठा धार्मिक होता. सुमतीला सन्नति नांवाचा मोठा वीर्यवान पुत्र झाला. याचा पुढें मोठा बलाढय कृत नांवाचा पुत्र झाला. हा कृत कौशल देशांतील इक्ष्वाकु कुलोत्पन्न राजा जो महात्मा हिरण्यनाभ त्याचा शिष्य होता. याने सामवेदाची संहिता चोवीस निरनिराळ्या रीतींनी गाण्याची पद्धत काढिली, व यामुळें याच्या पद्धतीप्रमाणें जे साम पढणारे आहेत त्यांना कार्तय (कृताचे अनुयायी) असें म्हणतात, व त्या सामांना प्राच्यसाम असें म्हणतात. या कृताला पुरुकुलांतील मोठा पराक्रमी असा वर सांगितलेला उग्रायुध हा झाला. याच्या पराक्रमाने पृषत राजाचा आजा जो पांचालाधिपति राजा नीप हा गतप्राण झाला. या उग्रायुधाला क्षेम्य नांवाचा मोठा लौकिकवान पुत्र झाला. क्षेम्याला पुढें सुवीर, सुवीराला पुढें नृपंजय व नृपंजयाला बहुरथ. हे सर्व राजे पुरुकुलोत्पन्न होत. असो; हा उग्रायुध जेव्हां अति माजला, तेव्हां त्याला वाईट वाईट बुद्धि सुचू लागली; त्यानें आपले सैन्य वाढवून नीप-कुलाचा व इतर अनेक राजांचा धुव्वा उडविला; इतकेंच करून न थांबता आमचे बाबा वारल्यावर त्यानें मस्तींत येऊन मला एक फारच वाईट गोष्ट ऐकविली; तो वृत्तांत असा: मी बाबा मेल्यावर एक दिवस माझे सोबत्यांना भोवताली घेऊन सहज धरणीवर निजलों असतां एकाएकीं या उग्रायुधाचा दूत आंत येऊन त्यानें आपल्या धन्याचा निरोप मला कळविला; तो हा -
"हे भीष्मा, तुझा बाप मेला आहे, तुझी आई जी गंधकाली (सत्यवती) हिचा रूपाविषयी मोठा लौकिक आहे. स्त्रियांमध्यें ती केवळ रत्नच आहे. तेव्हां अशीला आपली भार्या करावी अशी अस्मादिकांची तबियत लागली आहे. तरी, हे कुरुश्रेष्ठा, तुमच्या आईला या कामासाठीं मजकडे पाठवून द्यावी. असें सांगण्याचा माझा हक्क काय म्हणशील तर आजकाल या धरणीतलावर जी जी रत्ने म्हणून आहेत त्यांचा वाटेकरी मीच आहे; करितां हें स्त्रीरत्नही मलाच योग्य आहे. इतकी माझी मागणी तूं मान्य केलीस म्हणजे तुला कांहीं कमी नाहीं. तूं ढेकर देशील इतकी पुष्कळ दौलत व वाटेल तितके विस्तीर्ण राज्य ही मी तुला खुषीनें देईन, ही खात्री ठेव. मला आजकाल दुर्घट असें कांहींच नाहीं. माझ्या हातीं जे हे प्रज्वलित चक्र आहे हें इतकें अजिंक्य आहे कीं, रणांगणीं तें दृष्टीस पडतांच शत्रू सैरावैरा पळूं लागतात, ही गोष्ट तूं ध्यानांत घे; आणि तुझें राष्ट्र, तुझे प्राण व तुझे कुल ही सुरक्षित राहावी अशी जर तुझी इच्छा असेल तर मुकाटयाने माझ्या आज्ञेत तूं वाग; असें न करशील तर तुला शांति म्हणून कशी ती मिळूं देणार नाही."
-------------------------
चटकोपाख्यान:-२
धर्मराज म्हणतो - महाराज, हा उग्रायुध कोणाचा पुत्र, कोणच्या कुळांत जन्मला व आपण त्याला युद्धांत काय म्हणून मारिले, हें सर्व मला सांगा.
भीष्म सांगतात - बाबारे, मागें जो अजमीढ राजा सांगितला, त्याला यवीनर नांवाचा एक विद्वान पुत्र होता; यवीनराचे पोटीं धृतिमान झाला; धृतिमानाचा पुत्र सत्यधृति, सत्यधृतीचे उदरी प्रतापशाली दृढनेमी हा जन्मला. पुढें राजा सुधर्मा हा दृढनेमीचा पुत्र झाला. सुधर्म्याला पुढें सार्वभौम राजा हा पुत्र झाला. याला सार्वभौम म्हणण्याचें कारण खरोखरच तो सर्व पृथ्वीचा मालक झाला होता. याच्या सुप्रसिद्ध वंशांत पुढें पौरवांना आनंद देणारा महान नांवाचा राजा झाला; पुढें महानाला रुक्मरथ झाला, असे लिहिले आहे. रुक्मरथाचा पुत्र सुपार्श्व, सुपार्श्वाचा पुत्र सुमति हा मोठा धार्मिक होता. सुमतीला सन्नति नांवाचा मोठा वीर्यवान पुत्र झाला. याचा पुढें मोठा बलाढय कृत नांवाचा पुत्र झाला. हा कृत कौशल देशांतील इक्ष्वाकु कुलोत्पन्न राजा जो महात्मा हिरण्यनाभ त्याचा शिष्य होता. याने सामवेदाची संहिता चोवीस निरनिराळ्या रीतींनी गाण्याची पद्धत काढिली, व यामुळें याच्या पद्धतीप्रमाणें जे साम पढणारे आहेत त्यांना कार्तय (कृताचे अनुयायी) असें म्हणतात, व त्या सामांना प्राच्यसाम असें म्हणतात. या कृताला पुरुकुलांतील मोठा पराक्रमी असा वर सांगितलेला उग्रायुध हा झाला. याच्या पराक्रमाने पृषत राजाचा आजा जो पांचालाधिपति राजा नीप हा गतप्राण झाला. या उग्रायुधाला क्षेम्य नांवाचा मोठा लौकिकवान पुत्र झाला. क्षेम्याला पुढें सुवीर, सुवीराला पुढें नृपंजय व नृपंजयाला बहुरथ. हे सर्व राजे पुरुकुलोत्पन्न होत. असो; हा उग्रायुध जेव्हां अति माजला, तेव्हां त्याला वाईट वाईट बुद्धि सुचू लागली; त्यानें आपले सैन्य वाढवून नीप-कुलाचा व इतर अनेक राजांचा धुव्वा उडविला; इतकेंच करून न थांबता आमचे बाबा वारल्यावर त्यानें मस्तींत येऊन मला एक फारच वाईट गोष्ट ऐकविली; तो वृत्तांत असा: मी बाबा मेल्यावर एक दिवस माझे सोबत्यांना भोवताली घेऊन सहज धरणीवर निजलों असतां एकाएकीं या उग्रायुधाचा दूत आंत येऊन त्यानें आपल्या धन्याचा निरोप मला कळविला; तो हा -
"हे भीष्मा, तुझा बाप मेला आहे, तुझी आई जी गंधकाली (सत्यवती) हिचा रूपाविषयी मोठा लौकिक आहे. स्त्रियांमध्यें ती केवळ रत्नच आहे. तेव्हां अशीला आपली भार्या करावी अशी अस्मादिकांची तबियत लागली आहे. तरी, हे कुरुश्रेष्ठा, तुमच्या आईला या कामासाठीं मजकडे पाठवून द्यावी. असें सांगण्याचा माझा हक्क काय म्हणशील तर आजकाल या धरणीतलावर जी जी रत्ने म्हणून आहेत त्यांचा वाटेकरी मीच आहे; करितां हें स्त्रीरत्नही मलाच योग्य आहे. इतकी माझी मागणी तूं मान्य केलीस म्हणजे तुला कांहीं कमी नाहीं. तूं ढेकर देशील इतकी पुष्कळ दौलत व वाटेल तितके विस्तीर्ण राज्य ही मी तुला खुषीनें देईन, ही खात्री ठेव. मला आजकाल दुर्घट असें कांहींच नाहीं. माझ्या हातीं जे हे प्रज्वलित चक्र आहे हें इतकें अजिंक्य आहे कीं, रणांगणीं तें दृष्टीस पडतांच शत्रू सैरावैरा पळूं लागतात, ही गोष्ट तूं ध्यानांत घे; आणि तुझें राष्ट्र, तुझे प्राण व तुझे कुल ही सुरक्षित राहावी अशी जर तुझी इच्छा असेल तर मुकाटयाने माझ्या आज्ञेत तूं वाग; असें न करशील तर तुला शांति म्हणून कशी ती मिळूं देणार नाही."
No comments:
Post a Comment