*वज्रगोपिकानाम*
-------------------------
*भाग :- १०..*
'श्रीकृष्णानी गोपिकांना अध्यात्म शास्त्राचा उपदेश केला, त्या योगाने गोपिकांचा जीवकोश (जीवदशा) नष्ट होऊन त्यांना श्रीकृष्णस्वरूपाची प्राप्ती झाली.' मात्र भक्ताना आत्मैक्यबोध झाला तरी यावदायुष्य प्रेमसुखाचा आस्वाद घेतच राहतात.
कोणी म्हणेल, महात्म्यज्ञान नसले म्हणून काय बिघडले, ज्या वेळी श्रीकृष्ण या अवनीतलावर मूर्तरूपाने (द्वापारयुगात) वास्तव्य करीत होता, तेव्हा तोच भगवान पूर्ण ब्रह्म होताच. त्याच्याशी काम, क्रोध, भय, स्नेह, द्वेष, सौहृद, ऐक्य कोणत्याही स्वरूपाने संबंध आला तरी त्याचा उद्धार होतो असे श्रीशुकाचार्यच म्हणतात.
*कामंक्रोधं भयं स्नेहं ऐक्यं सौहृदमेव च ।*
*नित्यं हरौ विदधतो यान्ति तन्मयतां हि ते ॥*
भा. १० - २९ - १५
*तमेव परमात्मानं जारंबुद्धयापि संगताः ।*
*जहुर्गुणमयं देहं सद्यः प्रक्षीणबन्धना ॥*
भा. १० - २९ - ११
'त्या परमात्म्याशी जारबुद्धीने जरी त्या रत झाल्या तरी त्यांची सर्व बंधने सुटून त्यांनी गुणमय देहाचा त्याग केला म्हणजे त्या मुक्त झाल्या.' देवाशी भिन्न भिन्न भावनेने ज्यांचा संबंध आला ते ते मुक्त झाले. त्यांची नावेही सांगितली आहेत. नारद युधिष्ठिर संवादात नारद म्हणतात -
गोण्यः कामाद्भयात्कंसो द्वेषाच्चैद्यादयो नृपाः ।
संबंधाद्वष्णय स्नेहाद्यूयं भक्त्या वयं विभो ॥ भा. ७ - १ - ३०
गोपिका कामभावनेने, भयाने कंस, द्वेषाने शिशुपालादी राजे, संबंधाने यादव, स्नेहाने तुम्ही पांडव व भक्तीने आम्ही मुक्त झालो.
हीच गोष्ट श्रीकृष्णमुखाने श्रीज्ञानेश्वरमहाराजांनीही सांगितली आहे.
हेचि कवणें एकें मिसें । चित्त माझ्या ठायीं प्रवेशें ।
येतुलें हो मग आपैसे । मीचि होणे असे ॥
अगा वरी फोडावयालागी ।
लोहो मिळो का परिसाचे आंगी ।
कां जे मिळतिये प्रसंगी । सोनेचि होईल ॥
पाहे पा वालभाचेनि व्याजें । तिया व्रजांगनांची निजे ।
मज मीनलिया काय माझें । स्वरूप नव्हतीचि ॥
ना तरी भयाचेनिमिसें । मातें न पाविजेचि काय कंसे ।
की अखंड वैरवशे । चैद्यादिकी ॥
अगा सोयरेपणेचि पाडवा । माझें सायुज्य यादवा ।
की 'ममत्वे' वसुदेवा । दिकां सकळा ॥
नारदाध्रुवा अक्रूरा । शुका हन सनत्कुमारा ।
इया भक्ती मी धनुर्धरा । प्राप्यु जैसा ॥
तैसाचि गोपिकांशी कामे । तया कंसा भयसंभ्रमे ।
येरा घातकेया मनोधर्मे । शिशुपालादिका ॥
अगा मी येकु लाणीचे खागे । मग येवो ये भलतेनि मार्गे ।
भक्ती का विषये विरागें । अथवा वैरे ॥ ज्ञा. ९. ४६३ - ७०
एकादश स्कंधातही श्रीकृष्ण उद्धवास सांगतात -
अंधारी गूळ खाता । कडू न लगे तो सर्वथा ।
तेवी नेणोनि माझी सच्छिदानंदता ।
माते सविता मी झाल्या ॥
विष म्हणोनि अमृत घेतां । मरण जाऊनि ये अमरता ।
तेवी जारबुद्धी मातें भजतां । माझी सायुज्यता पावल्या ॥ - एकनाथी भागवत, १२. २०५ - ६
वरील शंकेचा आशय हा की, महात्म्यज्ञान नसले तरी केवल कामसंबंधाने भक्ती केली तरी उद्धार होतो हे खरे आहे; पण नारदांनी जे प्रेमाचे लक्षण सांगितले आहे व पुढेही ज्या प्रेमाचा विचार केला जाणार आहे त्या दृष्टीने पाहिल्यास महात्म्यज्ञान असणे आवश्यक ठरते. केवल कामसंबंधाने निरतिशय प्रेम प्रकर्ष संभवणार नाही, जसे भय, द्वेष इत्यादीसंबंधाने केवळ कंस शिशुपालादिकांना मोक्ष मिळाला तसा कामसंबंधाने मोक्ष मिळेल, पण प्रेमयोगात मोक्षनिरपेक्षता असते. भगवत्प्रेम प्रकर्ष हाच पुरुषार्थ मानला जातो. पुढे भक्ती हीच शांतिरूप व परमानंदरूप आहे असे नारदांनी म्हटले आहे. श्रीमधुसूदन सरस्वती फार मोठे अद्वैततत्वज्ञानी तसेच भक्तिशास्त्रकार होऊन गेले. त्यांचा भक्तिरसायन नावाचा भक्तिशास्त्रावर अपूर्व विवेचन करणारा ग्रंथ प्रसिद्ध आहे. त्यात भक्तीच्या अकरा भूमिका त्यांनी सांगितल्या आहेत. त्यात *स्वरूपाधिगति* म्हणजे परमात्मस्वरूपाचे यथार्थज्ञान ही सहावी भूमिका मानली आहे व ' *प्रेमपराकाष्ठा* ' ही शेवटची अकरावी भूमिका मानली आहे. गोपिका या अंतिम भूमिकेवर आरूढ झालेल्या होत्या. अतएव त्यांना स्वरूपज्ञान यथार्थरूपाने झाले होते हे वरील विस्तृत विवेचनावरून समजण्यासारखे आहे..
=======================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*
-------------------------
*भाग :- १०..*
'श्रीकृष्णानी गोपिकांना अध्यात्म शास्त्राचा उपदेश केला, त्या योगाने गोपिकांचा जीवकोश (जीवदशा) नष्ट होऊन त्यांना श्रीकृष्णस्वरूपाची प्राप्ती झाली.' मात्र भक्ताना आत्मैक्यबोध झाला तरी यावदायुष्य प्रेमसुखाचा आस्वाद घेतच राहतात.
कोणी म्हणेल, महात्म्यज्ञान नसले म्हणून काय बिघडले, ज्या वेळी श्रीकृष्ण या अवनीतलावर मूर्तरूपाने (द्वापारयुगात) वास्तव्य करीत होता, तेव्हा तोच भगवान पूर्ण ब्रह्म होताच. त्याच्याशी काम, क्रोध, भय, स्नेह, द्वेष, सौहृद, ऐक्य कोणत्याही स्वरूपाने संबंध आला तरी त्याचा उद्धार होतो असे श्रीशुकाचार्यच म्हणतात.
*कामंक्रोधं भयं स्नेहं ऐक्यं सौहृदमेव च ।*
*नित्यं हरौ विदधतो यान्ति तन्मयतां हि ते ॥*
भा. १० - २९ - १५
*तमेव परमात्मानं जारंबुद्धयापि संगताः ।*
*जहुर्गुणमयं देहं सद्यः प्रक्षीणबन्धना ॥*
भा. १० - २९ - ११
'त्या परमात्म्याशी जारबुद्धीने जरी त्या रत झाल्या तरी त्यांची सर्व बंधने सुटून त्यांनी गुणमय देहाचा त्याग केला म्हणजे त्या मुक्त झाल्या.' देवाशी भिन्न भिन्न भावनेने ज्यांचा संबंध आला ते ते मुक्त झाले. त्यांची नावेही सांगितली आहेत. नारद युधिष्ठिर संवादात नारद म्हणतात -
गोण्यः कामाद्भयात्कंसो द्वेषाच्चैद्यादयो नृपाः ।
संबंधाद्वष्णय स्नेहाद्यूयं भक्त्या वयं विभो ॥ भा. ७ - १ - ३०
गोपिका कामभावनेने, भयाने कंस, द्वेषाने शिशुपालादी राजे, संबंधाने यादव, स्नेहाने तुम्ही पांडव व भक्तीने आम्ही मुक्त झालो.
हीच गोष्ट श्रीकृष्णमुखाने श्रीज्ञानेश्वरमहाराजांनीही सांगितली आहे.
हेचि कवणें एकें मिसें । चित्त माझ्या ठायीं प्रवेशें ।
येतुलें हो मग आपैसे । मीचि होणे असे ॥
अगा वरी फोडावयालागी ।
लोहो मिळो का परिसाचे आंगी ।
कां जे मिळतिये प्रसंगी । सोनेचि होईल ॥
पाहे पा वालभाचेनि व्याजें । तिया व्रजांगनांची निजे ।
मज मीनलिया काय माझें । स्वरूप नव्हतीचि ॥
ना तरी भयाचेनिमिसें । मातें न पाविजेचि काय कंसे ।
की अखंड वैरवशे । चैद्यादिकी ॥
अगा सोयरेपणेचि पाडवा । माझें सायुज्य यादवा ।
की 'ममत्वे' वसुदेवा । दिकां सकळा ॥
नारदाध्रुवा अक्रूरा । शुका हन सनत्कुमारा ।
इया भक्ती मी धनुर्धरा । प्राप्यु जैसा ॥
तैसाचि गोपिकांशी कामे । तया कंसा भयसंभ्रमे ।
येरा घातकेया मनोधर्मे । शिशुपालादिका ॥
अगा मी येकु लाणीचे खागे । मग येवो ये भलतेनि मार्गे ।
भक्ती का विषये विरागें । अथवा वैरे ॥ ज्ञा. ९. ४६३ - ७०
एकादश स्कंधातही श्रीकृष्ण उद्धवास सांगतात -
अंधारी गूळ खाता । कडू न लगे तो सर्वथा ।
तेवी नेणोनि माझी सच्छिदानंदता ।
माते सविता मी झाल्या ॥
विष म्हणोनि अमृत घेतां । मरण जाऊनि ये अमरता ।
तेवी जारबुद्धी मातें भजतां । माझी सायुज्यता पावल्या ॥ - एकनाथी भागवत, १२. २०५ - ६
वरील शंकेचा आशय हा की, महात्म्यज्ञान नसले तरी केवल कामसंबंधाने भक्ती केली तरी उद्धार होतो हे खरे आहे; पण नारदांनी जे प्रेमाचे लक्षण सांगितले आहे व पुढेही ज्या प्रेमाचा विचार केला जाणार आहे त्या दृष्टीने पाहिल्यास महात्म्यज्ञान असणे आवश्यक ठरते. केवल कामसंबंधाने निरतिशय प्रेम प्रकर्ष संभवणार नाही, जसे भय, द्वेष इत्यादीसंबंधाने केवळ कंस शिशुपालादिकांना मोक्ष मिळाला तसा कामसंबंधाने मोक्ष मिळेल, पण प्रेमयोगात मोक्षनिरपेक्षता असते. भगवत्प्रेम प्रकर्ष हाच पुरुषार्थ मानला जातो. पुढे भक्ती हीच शांतिरूप व परमानंदरूप आहे असे नारदांनी म्हटले आहे. श्रीमधुसूदन सरस्वती फार मोठे अद्वैततत्वज्ञानी तसेच भक्तिशास्त्रकार होऊन गेले. त्यांचा भक्तिरसायन नावाचा भक्तिशास्त्रावर अपूर्व विवेचन करणारा ग्रंथ प्रसिद्ध आहे. त्यात भक्तीच्या अकरा भूमिका त्यांनी सांगितल्या आहेत. त्यात *स्वरूपाधिगति* म्हणजे परमात्मस्वरूपाचे यथार्थज्ञान ही सहावी भूमिका मानली आहे व ' *प्रेमपराकाष्ठा* ' ही शेवटची अकरावी भूमिका मानली आहे. गोपिका या अंतिम भूमिकेवर आरूढ झालेल्या होत्या. अतएव त्यांना स्वरूपज्ञान यथार्थरूपाने झाले होते हे वरील विस्तृत विवेचनावरून समजण्यासारखे आहे..
=======================📓
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*
No comments:
Post a Comment