*शालीग्राम व तुलसी माहात्म्य*
--------------------------------------------
श्रीनारायणमुनी म्हणाले, "हे नारदा, सिद्धी प्राप्त व्हावी म्हणून हरीने शंखचूडाचे कवच मागून घेतले. शंखवूडाचे रूप घेऊन तो नगरीत गेला. प्रासादाजवळ जाऊन त्याने विजय प्राप्त झाल्याची निशाणी म्हणून दुंदुभीचा गजर करविला. जयदुंदुभी ऐकताच तुलसीला अत्यानंद झाला आणि गवाक्षातून ती राजमार्गाकडे पाहू लागली. इकडे श्रीहरीने ब्राह्मणांना दाने दिली. शुभाशुभ वार्ता सांगणार्या हेरांनाही विपुल द्रव्य दिले.
रथातून उतरल्यावर तो तुलसीच्या मंदिरात गेला. त्या रत्नजडित मंदिरात पोहोचताच तुलसीने त्याला पती समजून त्याचे पूज्य भावनेने पाय धुतले. त्याला नमस्कार करून त्या कामुकीने श्रीहरीला शृंगारलेल्या रत्नमय मंचकावर बसविले. त्याला सुवासिक तांबूल दिला. ती म्हणाली,
"रणांगणातून परत आलेल्या पतीला अवलोकन करून मला परम आनंद झाला आहे. आज माझे जीवन सफल झाले."
कामविव्हल होऊन तिने त्याच्याकडे पाहून कामुक कटाक्ष फेकले. तिने पतीला रणातील वृत्तांत विचारले, "हे प्रभो, विश्वसंहारक शंकराशी युद्ध करून तुमचा जय कसा झाला ?"
तेव्हा तो प्रभू हसतमुखाने म्हणाला, "हे कांते, एक पूर्ण वर्ष युद्ध झाल्यावर ब्रह्मदेवाच्या आज्ञेवरून मी देवांचे राज्य परत दिले. मी व शिव आपापल्या स्थानी गेले. हे कामिनी, सर्व दानवांचा नाश झाला आहे. ब्रह्मदेवाने देवांचे व माझे सख्य करून दिले. नंतर मी येथे आलो."
असे सांगून तो जगन्नाथ मंचकावर पहुडला. ते दोघेही रममाण झाले. पण सुरतक्रीडेचे विविध प्रकार लक्षात येताच ती भयभीत झाली. सर्व प्रकार तिच्या ध्यानी आला. ती म्हणाली, "हे कपटशिरोमणे, तू कोण ? कपटाने तू मला भोगलेस, तू माझे सतित्त्व भंग केलेस, म्हणून मी तुला शाप देते."
हे शब्द ऐकताच श्रीहरीने आपले मनोहर दर्शन दिले. त्या सनातन, तेजस्वी, पीतवस्त्रधारी देवास पहाताच तिला मूर्च्छा आली. सावध झाल्यावर ती म्हणाली, "हे देवा, तू पाषाणहृदयी आहेस. कपटाने तू धर्मभंग करून माझ्या स्वामीस मारलेस, म्हणून हे प्रभो, तू संसारास पाषाण होऊन रहाशील. तुला साधु म्हणणारे सर्वजण मूर्ख आहेत. तू माझ्या पतीला मारलेस."
असे म्हणून ती विव्हल होऊन रडू लागली. त्यानंतर त्या कमलापतीने तिला नीतिमत्तेच्या गोष्टी सांगून तिचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. श्रीभगवान म्हणाले, "हे कल्याणी, तू माझ्यासाठी व शंखचूडाने तुझ्यासाठी दारूण तप केले. तुझ्या तपाची फलप्राप्ती व्हावी म्हणून तू दिव्य देह धारण करून रमेप्रमाणे माझ्याशी रममाण हो. तुझे शरीर गंडकी नावाच्या नदीरूप होवो. तू भारत वर्षात पुण्यवान हो. तुझे जल पाप्यांना पवित्र करणारे होवो. तुझा केशसंभार पुण्यवृक्षाप्रमाणे होईल. तू तुलसी नावाने प्रसिद्ध पावशील.
तू पुष्पांत श्रेष्ठ होशील. गोलोकात विरजा नदीच्या तीरावर, वृंदावनातील रासमंडलात, चंपकवनात, चंदनवनात, सर्व ठिकाणी तुझे पुण्यकारक वास्तव्य होवो. माझ्या वराने वृक्षाच्या मूळ ठिकाणी पुण्यक्षेत्र होईल. तुलसीपत्राने अभिषेक केल्याने पुण्यक्षेत्रातील स्नानाचे पुण्य मिळेल. हजारो अमृतघटांपेक्षा तुळशीच्या एका पानाने हरी तृप्त होतो. हजार गोप्रदानाचे पुण्य कार्तिकात तुळशीपत्र वाहिल्याने मिळते. मृत्यूसमयी तुलसीपत्राचे उदक प्राप्त होणार्यास मुक्ती मिळते.
नित्य तुलसीपत्र भक्षण करणार्यास हजारो अश्वमेधांचे पुण्य मिळते. तुलसीपत्र हातात घेऊन दिलेले वचन न पाळणार्यास कालसूत्र नरकाची प्राप्ती होते, तसेच खोटी शपथ वहाणार्यास चौदा इंद्र होईतो कुंभीपाक नरकात खितपत पडावे लागते.
पौर्णिमा, अमावास्या, द्वादशी, सूर्यक्रांतीचे दिवशी तसेच अपवित्रकाली, मलिन वस्त्रासहित जे तुलसीपत्र तोडतात ते हरीचेच मस्तक तोडतात. या वृक्षाची अधिष्ठात्री देवी गोलोकात कृष्णासह नित्य क्रीडारत होते. नदीच्या अधिष्ठात्री देवता, माझ्या अंशरूप लावण्याने सागराची पत्नी होईल. तू वैकुंठात माझी प्रियाच होशील.
तुझ्या शापामुळे मी गंडकीतीरावर शैलरूपाने वसती करीन. तीस दाढांनी युक्त असलेले असंख्य किडे तेथे शीलेवर माझे चक्र करतील. तेच लक्ष्मीनारायण चक्र होय. दोन द्वारातील चार चक्रांचे गोप्रदान असलेले चक्र रघुनाथ म्हणून प्रसिद्ध आहे. लहान व दोन चक्रांनी युक्त असे जे चक्र त्याला वासनामिध म्हणतात. अत्यंत व वनमालायुक्त चक्राला श्रीधर म्हणतात. स्थूल व वर्तुलाकार असलेल्या चक्राचे नाव दामोदर आहे.
मध्यम आकाराच्या, बाण कोरलेल्या चक्रास रणराम म्हणतात. सात चक्रे छत्रभूषणांनी युक्त असल्यास राजराजेश्वर चक्र, मेघकांतीचे चारी फले देणारे अनंत चक्र, चक्राकार दोन चाके असलेले मधुसूदन चक्र, ज्या चक्रावरील सुदर्शन गुप्त आहे ते गदाधर चक्र, दोन चक्रांचे ओबडधोबड असलेले वैराग्यदायक नारसिंहचक्र, विस्तृत मुखांचे दोन चक्रे असलेले लक्ष्मीनृसिंह, द्वारभागी वासुदेव चक्र हे सर्व मनोरथ पूर्ण करणारे आहे.
सर्वांना सुख देणारे प्रद्युम्न चक्र, तसेच सर्वफल देणारे संकर्षण चक्र, पिवळे व वर्तुलाकार अनिरुद्ध नावाचे चक्र सुखदायक आहे.
ज्या ठिकाणी शालग्राम शीला असते, तेथे हरी व लक्ष्मी रहात असते. त्याच्या पूजनाने पातकांपासून मुक्ती मिळते. छत्राकार शीला असल्यास राज्यप्राप्ती, वर्तुळाकार असल्यास संपत्ती, शकटाकार असेल तर दुःख, शूलाप्रमाणे अग्रभाग असल्यास मृत्यू, शीलेचे मुख ओबडधोबड असल्यास दारिद्र्य, पिंगल असल्यास हानी, भग्न झाले असल्यास व्याधी प्राप्त होते, विदीर्ण असल्यास मरण संभवते.
व्रत, दान, प्रतिष्ठा, श्रद्धा, देवाची पूजा वगैरेमध्ये शालिग्राम असल्यास प्रशस्त होते. शालिग्राम असणार्याला तीर्थक्षेत्रात स्नान केल्याचे पुण्य मिळते, तसेच त्याला यज्ञदीक्षेचे, तीर्थे, व्रते, तपे वगैरे केल्याचे पुण्य मिळते. शालिग्रामशीलेचे उदक प्राशन केल्यास सर्व मनोरथ पूर्ण होतात. अंतकाली तो वैकुंठात जातो. ब्रह्महत्त्येची पापेसुद्धा नष्ट होतात.
त्याच्या पदरजाने देवी वसुंधराही सत्वर पवित्र होते.
शालिग्राम हातात धरून खोटे बोलणारा ब्रह्मदेवाचे आयुष्य असेपर्यंत कुंभिपाक नरकात पडतो. शालिग्राम शीला घेऊन असत्य वचन करणारा एक लक्ष मन्वंतरे असिपत्र नावाच्या नरकात पडतो.
हे कांते, "शालिग्रामावरील तुलसीपत्राचा विच्छेद केल्यास स्त्रीवियोग घडतो. शंखावरील तुलसीपत्राचा विच्छेद केल्यास भार्याहीन व रोगग्रस्त होतो. शालिग्राम, शंख व तुलसी हे एकत्र ठेवणारा महाज्ञानी व हरीप्रिय होतो.
एकदा जो जिच्या ठिकाणी वीर्याधान करतो, तिचा विच्छेद केल्यास त्याला दुःखे प्राप्त होतात. तू एक मन्वंतर शंखचूडाची प्रिया आहेस म्हणून तुझा शंखाशी वियोग होणे हे दुःखद आहे."
श्रीहरीने अशारीतीने तुलसीची समजूत घातली. नंतर देह टाकून तिने दिव्यरूप धारण केले आणि ती हरीच्या वक्षस्थळी राहिली. नंतर तिच्यासह श्रीहरी वैकुंठी गेला. लक्ष्मी, सरस्वती, गंगा, तुलसी चारी स्त्रिया हरीला प्रिय आहेत.
त्याचवेळी तिच्या देहापासून गंडकी नदी उत्पन्न झाली. हरीसुद्धा तिच्या तीरावरील एक पर्वत झाला. तेथील विविध किडे, विविध शीला कोरत असतात. त्यातील उदकात पडणार्या शीला पुण्यफल देणार्या असतात. जमिनीवर पडलेल्या शीला सूर्याच्या उष्णतेमुळे पिंगल होतात.
========================☀
*सं :- श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*
--------------------------------------------
श्रीनारायणमुनी म्हणाले, "हे नारदा, सिद्धी प्राप्त व्हावी म्हणून हरीने शंखचूडाचे कवच मागून घेतले. शंखवूडाचे रूप घेऊन तो नगरीत गेला. प्रासादाजवळ जाऊन त्याने विजय प्राप्त झाल्याची निशाणी म्हणून दुंदुभीचा गजर करविला. जयदुंदुभी ऐकताच तुलसीला अत्यानंद झाला आणि गवाक्षातून ती राजमार्गाकडे पाहू लागली. इकडे श्रीहरीने ब्राह्मणांना दाने दिली. शुभाशुभ वार्ता सांगणार्या हेरांनाही विपुल द्रव्य दिले.
रथातून उतरल्यावर तो तुलसीच्या मंदिरात गेला. त्या रत्नजडित मंदिरात पोहोचताच तुलसीने त्याला पती समजून त्याचे पूज्य भावनेने पाय धुतले. त्याला नमस्कार करून त्या कामुकीने श्रीहरीला शृंगारलेल्या रत्नमय मंचकावर बसविले. त्याला सुवासिक तांबूल दिला. ती म्हणाली,
"रणांगणातून परत आलेल्या पतीला अवलोकन करून मला परम आनंद झाला आहे. आज माझे जीवन सफल झाले."
कामविव्हल होऊन तिने त्याच्याकडे पाहून कामुक कटाक्ष फेकले. तिने पतीला रणातील वृत्तांत विचारले, "हे प्रभो, विश्वसंहारक शंकराशी युद्ध करून तुमचा जय कसा झाला ?"
तेव्हा तो प्रभू हसतमुखाने म्हणाला, "हे कांते, एक पूर्ण वर्ष युद्ध झाल्यावर ब्रह्मदेवाच्या आज्ञेवरून मी देवांचे राज्य परत दिले. मी व शिव आपापल्या स्थानी गेले. हे कामिनी, सर्व दानवांचा नाश झाला आहे. ब्रह्मदेवाने देवांचे व माझे सख्य करून दिले. नंतर मी येथे आलो."
असे सांगून तो जगन्नाथ मंचकावर पहुडला. ते दोघेही रममाण झाले. पण सुरतक्रीडेचे विविध प्रकार लक्षात येताच ती भयभीत झाली. सर्व प्रकार तिच्या ध्यानी आला. ती म्हणाली, "हे कपटशिरोमणे, तू कोण ? कपटाने तू मला भोगलेस, तू माझे सतित्त्व भंग केलेस, म्हणून मी तुला शाप देते."
हे शब्द ऐकताच श्रीहरीने आपले मनोहर दर्शन दिले. त्या सनातन, तेजस्वी, पीतवस्त्रधारी देवास पहाताच तिला मूर्च्छा आली. सावध झाल्यावर ती म्हणाली, "हे देवा, तू पाषाणहृदयी आहेस. कपटाने तू धर्मभंग करून माझ्या स्वामीस मारलेस, म्हणून हे प्रभो, तू संसारास पाषाण होऊन रहाशील. तुला साधु म्हणणारे सर्वजण मूर्ख आहेत. तू माझ्या पतीला मारलेस."
असे म्हणून ती विव्हल होऊन रडू लागली. त्यानंतर त्या कमलापतीने तिला नीतिमत्तेच्या गोष्टी सांगून तिचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. श्रीभगवान म्हणाले, "हे कल्याणी, तू माझ्यासाठी व शंखचूडाने तुझ्यासाठी दारूण तप केले. तुझ्या तपाची फलप्राप्ती व्हावी म्हणून तू दिव्य देह धारण करून रमेप्रमाणे माझ्याशी रममाण हो. तुझे शरीर गंडकी नावाच्या नदीरूप होवो. तू भारत वर्षात पुण्यवान हो. तुझे जल पाप्यांना पवित्र करणारे होवो. तुझा केशसंभार पुण्यवृक्षाप्रमाणे होईल. तू तुलसी नावाने प्रसिद्ध पावशील.
तू पुष्पांत श्रेष्ठ होशील. गोलोकात विरजा नदीच्या तीरावर, वृंदावनातील रासमंडलात, चंपकवनात, चंदनवनात, सर्व ठिकाणी तुझे पुण्यकारक वास्तव्य होवो. माझ्या वराने वृक्षाच्या मूळ ठिकाणी पुण्यक्षेत्र होईल. तुलसीपत्राने अभिषेक केल्याने पुण्यक्षेत्रातील स्नानाचे पुण्य मिळेल. हजारो अमृतघटांपेक्षा तुळशीच्या एका पानाने हरी तृप्त होतो. हजार गोप्रदानाचे पुण्य कार्तिकात तुळशीपत्र वाहिल्याने मिळते. मृत्यूसमयी तुलसीपत्राचे उदक प्राप्त होणार्यास मुक्ती मिळते.
नित्य तुलसीपत्र भक्षण करणार्यास हजारो अश्वमेधांचे पुण्य मिळते. तुलसीपत्र हातात घेऊन दिलेले वचन न पाळणार्यास कालसूत्र नरकाची प्राप्ती होते, तसेच खोटी शपथ वहाणार्यास चौदा इंद्र होईतो कुंभीपाक नरकात खितपत पडावे लागते.
पौर्णिमा, अमावास्या, द्वादशी, सूर्यक्रांतीचे दिवशी तसेच अपवित्रकाली, मलिन वस्त्रासहित जे तुलसीपत्र तोडतात ते हरीचेच मस्तक तोडतात. या वृक्षाची अधिष्ठात्री देवी गोलोकात कृष्णासह नित्य क्रीडारत होते. नदीच्या अधिष्ठात्री देवता, माझ्या अंशरूप लावण्याने सागराची पत्नी होईल. तू वैकुंठात माझी प्रियाच होशील.
तुझ्या शापामुळे मी गंडकीतीरावर शैलरूपाने वसती करीन. तीस दाढांनी युक्त असलेले असंख्य किडे तेथे शीलेवर माझे चक्र करतील. तेच लक्ष्मीनारायण चक्र होय. दोन द्वारातील चार चक्रांचे गोप्रदान असलेले चक्र रघुनाथ म्हणून प्रसिद्ध आहे. लहान व दोन चक्रांनी युक्त असे जे चक्र त्याला वासनामिध म्हणतात. अत्यंत व वनमालायुक्त चक्राला श्रीधर म्हणतात. स्थूल व वर्तुलाकार असलेल्या चक्राचे नाव दामोदर आहे.
मध्यम आकाराच्या, बाण कोरलेल्या चक्रास रणराम म्हणतात. सात चक्रे छत्रभूषणांनी युक्त असल्यास राजराजेश्वर चक्र, मेघकांतीचे चारी फले देणारे अनंत चक्र, चक्राकार दोन चाके असलेले मधुसूदन चक्र, ज्या चक्रावरील सुदर्शन गुप्त आहे ते गदाधर चक्र, दोन चक्रांचे ओबडधोबड असलेले वैराग्यदायक नारसिंहचक्र, विस्तृत मुखांचे दोन चक्रे असलेले लक्ष्मीनृसिंह, द्वारभागी वासुदेव चक्र हे सर्व मनोरथ पूर्ण करणारे आहे.
सर्वांना सुख देणारे प्रद्युम्न चक्र, तसेच सर्वफल देणारे संकर्षण चक्र, पिवळे व वर्तुलाकार अनिरुद्ध नावाचे चक्र सुखदायक आहे.
ज्या ठिकाणी शालग्राम शीला असते, तेथे हरी व लक्ष्मी रहात असते. त्याच्या पूजनाने पातकांपासून मुक्ती मिळते. छत्राकार शीला असल्यास राज्यप्राप्ती, वर्तुळाकार असल्यास संपत्ती, शकटाकार असेल तर दुःख, शूलाप्रमाणे अग्रभाग असल्यास मृत्यू, शीलेचे मुख ओबडधोबड असल्यास दारिद्र्य, पिंगल असल्यास हानी, भग्न झाले असल्यास व्याधी प्राप्त होते, विदीर्ण असल्यास मरण संभवते.
व्रत, दान, प्रतिष्ठा, श्रद्धा, देवाची पूजा वगैरेमध्ये शालिग्राम असल्यास प्रशस्त होते. शालिग्राम असणार्याला तीर्थक्षेत्रात स्नान केल्याचे पुण्य मिळते, तसेच त्याला यज्ञदीक्षेचे, तीर्थे, व्रते, तपे वगैरे केल्याचे पुण्य मिळते. शालिग्रामशीलेचे उदक प्राशन केल्यास सर्व मनोरथ पूर्ण होतात. अंतकाली तो वैकुंठात जातो. ब्रह्महत्त्येची पापेसुद्धा नष्ट होतात.
त्याच्या पदरजाने देवी वसुंधराही सत्वर पवित्र होते.
शालिग्राम हातात धरून खोटे बोलणारा ब्रह्मदेवाचे आयुष्य असेपर्यंत कुंभिपाक नरकात पडतो. शालिग्राम शीला घेऊन असत्य वचन करणारा एक लक्ष मन्वंतरे असिपत्र नावाच्या नरकात पडतो.
हे कांते, "शालिग्रामावरील तुलसीपत्राचा विच्छेद केल्यास स्त्रीवियोग घडतो. शंखावरील तुलसीपत्राचा विच्छेद केल्यास भार्याहीन व रोगग्रस्त होतो. शालिग्राम, शंख व तुलसी हे एकत्र ठेवणारा महाज्ञानी व हरीप्रिय होतो.
एकदा जो जिच्या ठिकाणी वीर्याधान करतो, तिचा विच्छेद केल्यास त्याला दुःखे प्राप्त होतात. तू एक मन्वंतर शंखचूडाची प्रिया आहेस म्हणून तुझा शंखाशी वियोग होणे हे दुःखद आहे."
श्रीहरीने अशारीतीने तुलसीची समजूत घातली. नंतर देह टाकून तिने दिव्यरूप धारण केले आणि ती हरीच्या वक्षस्थळी राहिली. नंतर तिच्यासह श्रीहरी वैकुंठी गेला. लक्ष्मी, सरस्वती, गंगा, तुलसी चारी स्त्रिया हरीला प्रिय आहेत.
त्याचवेळी तिच्या देहापासून गंडकी नदी उत्पन्न झाली. हरीसुद्धा तिच्या तीरावरील एक पर्वत झाला. तेथील विविध किडे, विविध शीला कोरत असतात. त्यातील उदकात पडणार्या शीला पुण्यफल देणार्या असतात. जमिनीवर पडलेल्या शीला सूर्याच्या उष्णतेमुळे पिंगल होतात.
========================☀
*सं :- श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*